बॅनर कोसळण्याच्या घटनेने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर..!
Oplus_16908288
गर्दीच्या ठिकाणी बॅनर कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली
पुणे | गंज पेठ : दहीहंडी कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेले मोठे बॅनर अचानक कोसळल्याची घटना गंज पेठ परिसरात घडली. बॅनर अचानक खाली आल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र, गर्दीच्या ठिकाणी अशा पद्धतीने मोठा बॅनर कोसळणे ही गंभीर बाब मानली जात आहे. बॅनर नागरिकांच्या अंगावर किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर कोसळला असता तर मोठा अनर्थ घडू शकला असता.
उत्सवांच्या काळात नागरिकांची मोठी वर्दळ असते. अशा वेळी उभारण्यात येणारे मोठे बॅनर, फलक आणि जाहिरातींच्या संरचना सुरक्षित आहेत का, याची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे. फलक उभारण्यापूर्वी त्याची मजबुती, बांधणी आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार केला जातो का? असा सवाल या घटनेनंतर उपस्थित होत आहे.
आजची घटना जीवितहानीशिवाय टळली असली, तरी ‘सुदैवाने बचावले’ हा सुरक्षिततेचा पर्याय ठरू शकत नाही. भविष्यात अशा घटना घडण्यापूर्वीच संबंधित यंत्रणांनी धोकादायक किंवा असुरक्षित बॅनरची तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करणे गरजेचे आहे.
उत्सवाचा उत्साह कायम राहू द्या; मात्र नागरिकांच्या सुरक्षेची किंमत मोजून नाही!
📍 गंज पेठ, पुणे
#Pune #GanjPeth #DahiHandi #PuneNews #BreakingNews #गंजपेठ #दहीहंडी #नागरिकसुरक्षा #पुणे
— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com
मो. ८३७८९५७६७४