सचिनदादा कल्याणशेट्टी यांना रीपाईचे अविनाश मडीखांबे यांची खंबीर साथ ठरली निर्णायक मित्रपक्ष म्हणून मोलाची साथ

प्रतिनिधी दिनांक 29/11/ 2024
2019 पासून 2024 या कालावधीमध्ये अक्कलकोट तालुक्यात होऊन गेलेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मित्रपक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट याची खंबीर साथ मिळाली असून रिपाईचे तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी सुरुवातीपासूनच प्रामाणिकपणे सचिनदादा कल्याणशेट्टी यांना पूर्ण ताकतीशी साथ दिली आहे यंदाही त्याची प्रचिती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून आले 2019 मध्ये देखील अविनाश मडीखांबे यांनी संपूर्ण तालुका पिंजून काढून दलित समाजाची मते भारतीय जनता पक्षाकडे वळवलेली होती.


या निवडणुकीत दलित अल्पसंख्यांक मते विभागली जातील अशी शक्यता वर्तवली जात होती परंतु अविनाश मडीखांबे यांनी 2019 प्रमाणे यावेळीही संपूर्ण तालुका आपल्या संपूर्ण टीमचा पिंजून काढून मोक्याच्या ठिकाणी आपल्या खास शैलीच्या रोखठोक भाषणाने मतदारांची मने जिंकून आंबेडकरी मते महायुतीच्या पारड्यात टाकली दांडगा जनसंपर्क आणि युवा नेतृत्व यामुळे नेहमी महायुतीला अविनाश यांनी खंबीर अशी साथ दिलेली आहे काँग्रेस किंवा वंचित कडे दलित नेते वळतील असे अनेकांनी तर्क लावलेले असताना सुद्धा अविनाश मडीखांबे यांच्या मतदारसंघातील संपर्कामुळे आणि प्रचारामुळे आंबेडकरी मते महायुतीला पडून सचिन दादा कल्याण शेट्टी यांच्या मताधिक्य वाढण्यास मदत झाली दुधनी भागात रिपाईचे सैदप्पा झळकी, तडवळ भागात सिद्धार्थ गायकवाड, आप्पा भालेराव चपळगाव भागात तम्मा गजदाने जेऊर जिल्हा परिषद गट अंबादास गायकवाड, पानमंगरूळ दिलीप माळी सलगर भागात राजू भगळे,शहरात शहराध्यक्ष अजय मुकणार,रोमित मडीखांबे नितेश मडीखांबे शुभम मडीखांबे सुरेश सोनकांबळे तसेच रिपाईचे अभ्यासू पश्चिम महाराष्ट्र नेते राहुल रूही यांनी तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तालुक्यामध्ये प्रचारात आघाडी घेऊन महायुतीला निवडून आणण्यात मोलाची भूमिका बजावली अक्कलकोट तालुक्यातील रिपाईच्या सर्व शाखांनी यावेळी मताधिक्य आपापल्या गावांमध्ये दिल्याचे दिसून आले 2019 पासून 2024 पर्यंत रिपब्लिकन पक्षाने दिलेल्या प्रामाणिक आणि निर्णायक साथीमुळे महायुतीला सर्व निवडणुकांमध्ये यश आल्याचे दिसून येते भविष्यामध्ये महायुतीचा महत्वाचा घटक पक्ष म्हणून रिपाईच्या किंबहुना अविनाश मडीखांबे यांच्या रूपाने सचिनदादा कल्याणशेट्टी काय न्याय देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे