राज्यातील शाळांसाठी नवे वेळापत्रक जाहीर; १६ जूनपासून ९ वाजता शाळा सुरू; पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; वेळापत्रकात मोठा बदल

0
School-New-Timings.webp

मुंबई | प्रतिनिधी

राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मंडळाच्या (SSC) शाळा येत्या १६ जूनपासून सुरू होणार असून, शाळेच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. नव्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून राज्यातील सर्व शाळा आता सकाळी ७ ऐवजी ९ वाजता सुरू होणार असून, सायंकाळी ४ वाजता सुटणार आहेत.

सध्या शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांसह पालकांनी तयारीला सुरुवात केली आहे. दप्तर, वह्या, पुस्तकं, वॉटर बॉटल खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी दिसत आहे. याच दरम्यान आलेल्या वेळापत्रकातील बदलाच्या निर्णयामुळे पालक वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

नवे वेळापत्रक कसे असेल?

शाळा सुरू: सकाळी ९.०० वाजता

परिपाठ: ९.०० ते ९.२५

पहिली तीन तासे: ९.२५ ते ११.२४

लघु सुट्टी: ११.२५ ते ११.३५

दोन तासे: ११.३५ ते १२.५०

मधली सुट्टी: १२.५० ते १.३०

उर्वरित तासे: १.३० ते ३.५५

वंदे मातरम् आणि सुट्टी: ३.५५ ते ४.००


नवीन वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना सकाळी लवकर उठण्याचा ताण कमी होणार असून, आरोग्याच्या दृष्टीनेही हा निर्णय उपयुक्त ठरेल, असे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

राज्यातील शाळा कधी सुरू?

महाराष्ट्र राज्य मंडळाच्या शाळा: १६ जून २०२५ पासून

CBSE बोर्डाच्या शाळा: ९ जूनपासून सुरू

विदर्भातील ११ जिल्हे वगळून राज्यातील बहुतांश शाळा १६ जून रोजी सुरू होणार


राज्यातील उन्हाळी सुट्टी संपण्याच्या मार्गावर असून, शाळांचे घंटानाद लवकरच पुन्हा ऐकू येणार आहेत. शिक्षण विभागाने वेळेवर तयारी करण्याचे आवाहन शाळांना आणि पालकांना केले आहे.



नवीन वेळापत्रकाचे फायदे:
✔ विद्यार्थ्यांना सकाळी अधिक झोप मिळेल
✔ उष्णतेपासून वाचण्यासाठी वेळेत बदल
✔ दिनक्रमात शिस्त व सुसूत्रता



शिक्षण विभागाचे आवाहन:
पालकांनी व विद्यार्थ्यांनी वेळापत्रकातील बदलाची माहिती लक्षात ठेवून नियोजन करावे. शाळांच्या वेळेत बदल करण्यात आल्यामुळे ये-जा व्यवस्था, दुपारच्या जेवणाची तयारी, अभ्यासाचे नियोजन यामध्ये योग्य समायोजन करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed