खासगी ट्रॅव्हल्सवर दंड, पण लालपरीला मुभा का? ‘लालपरी’त क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी; कारवाई कुठे? प्रवाशांचा सवाल

1200-675-23732069-1071-23732069-1741856117047.jpg


पुणे, ९ मे: खासगी ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आढळल्यास तात्काळ दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमध्ये (लालपरी) याच प्रकारची परिस्थिती असूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवासाची सुविधा, उन्हाळी सुट्ट्यांमुळे प्रवासात वाढ, तसेच सध्या सुरू असलेली लग्नसराई यामुळे लालपरीत प्रचंड गर्दी होत आहे. अनेक बसगाड्यांमध्ये उभे राहायलाही जागा उरत नाही. अशा परिस्थितीत खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होते, मग लालपरीसारख्या शासकीय बसेसवर तीच तंत्र लागू का होत नाही, असा सवाल प्रवासी उपस्थित करत आहेत.

चालक-वाहकांचे आवाहन अनोळखी; प्रवाशांचे दुर्लक्ष

गर्दीमुळे चालक व वाहक मागून येणाऱ्या बसने प्रवास करण्याचा सल्ला देतात, मात्र प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी एका बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले जातात. त्यामुळे प्रवासाचा दर्जा आणि सुरक्षितता दोन्ही धोक्यात येतात.

उत्पन्नात वाढ, पण सेवा तशीच

एप्रिल महिन्यात चंद्रपूर विभागाच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, त्याच वेळी प्रवाशांना भोगाव्या लागणाऱ्या असुविधा, गर्दी, उभं राहून प्रवास, यावर कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.

प्रवाशांची मागणी – बसफेऱ्या वाढवा, सुरक्षितता सुनिश्चित करा

प्रवाशांकडून मागणी केली जात आहे की, बसफेऱ्या तातडीने वाढवाव्यात, शहरी व ग्रामीण भागात बससेवा सुरळीत करावी, आणि गर्दीच्या तक्रारींवर गांभीर्याने विचार करून शासकीय बससेवेलाही नियमांत बांधावे.

या परिस्थितीत प्रशासनाने लक्ष घालून प्रवाशांच्या सुरक्षिततेची व सोयीसुविधांची योग्य ती काळजी घ्यावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

Spread the love

You may have missed