जेलमध्ये ‘मॉल’चा अनुभव! – चुरमुऱ्यापासून दारूपर्यंत सर्व काही उपलब्ध, पण दर ऐकून डोळे विस्फारले जातील – पहा व्हिडिओ

0
IMG_20250621_132102.jpg

कोल्हापूर | प्रतिनिधी
राज्यातील तुरुंग व्यवस्थेच्या गंभीर स्थितीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी माहिती समोर आली आहे. कोल्हापूरमधील बिंदू चौक येथील कारागृहात शिक्षा भोगून आलेल्या एका तरुणाने जेलमधील वस्तूंचे रेट कार्ड साम टीव्हीशी बोलताना उघड केले. तुरुंगातील अव्यवस्थेचा आणि पैशांच्या जोरावर मिळणाऱ्या सुखसोयींचा हा धक्कादायक खुलासा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

सदर तरुणाने सांगितले की, “कोणतीही वस्तू हवी असल्यास ती तुरुंगात सहज उपलब्ध होते. केवळ योग्य त्या ‘रेट’ला पैसे फेकले की, तुम्हाला हवे ते सगळं मिळू शकतं – अगदी चुरमुऱ्यापासून ते दारूपर्यंत!”

‘रेट कार्ड’ चकित करणारे

साम टीव्हीला दिलेल्या माहितीप्रमाणे, जेलमधील वस्तूंचे दर सामान्य नागरिकांच्या कल्पनाही पार करतात. काही उदाहरणे पुढीलप्रमाणे –

तंबाखूची साधी पुडी – ₹५००

दारूचा एक कॉटर (चादर) – ₹२५,०००

सिगारेट – ₹१०० प्रती नग

बिडी – ₹५० प्रती नग

चहा किंवा बिस्किटांची पुडी – ₹३०० ते ₹५०० पर्यंत

मोबाइल वापरण्याची सोय – ₹५,००० ते ₹१०,००० (काही मिनिटांसाठी)


‘पैसा फेको, तमाशा देखो’ – जेलमधील वास्तव

हा व्हिडिओ

Link source: saam tv

“जेलमध्ये पैसा फेकला की तमाशा पाहायला मिळतो,” असे या तरुणाने स्पष्टपणे सांगितले. तुरुंगात काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या संमतीने हे सर्व व्यवहार सुरू असतात, असा आरोपही त्याने केला. अशा प्रकारे नियम व कायद्यांना हरताळ फासणारे प्रकार तुरुंगाच्या बंद दरवाजामागे सर्रास सुरू आहेत, हे या माहितीवरून अधोरेखित होते.

कारागृह प्रशासनाचे मौन संशयास्पद

या प्रकरणावर अद्याप कारागृह प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी आता समाज माध्यमांवरून आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून जोर धरत आहे.

तुरुंग म्हणजे शिक्षेचे ठिकाण की भ्रष्टाचाराचा अड्डा?

या माहितीमुळे अनेक तोंडं बंदिस्त तुरुंग व्यवस्थेकडे पुन्हा एकदा संशयाने पाहू लागली आहेत. एकीकडे जेलमध्ये सुधारणा आणि पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट ठेवले जाते, तर दुसरीकडे अशा भ्रष्ट व्यवस्थेमुळे तुरुंगच गुन्हेगारीचे केंद्र बनतो, अशी तिव्र टीका होत आहे.

राज्य सरकार व गृहविभागाने या गंभीर आरोपांची दखल घेऊन तत्काळ उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी जनतेची मागणी आहे. अन्यथा तुरुंग व्यवस्थेचा विश्वास आणि उद्देश दोन्ही धोक्यात येऊ शकतात.

Spread the love

Leave a Reply

You may have missed