पुणे: “१० वर्षांनी पुन्हा आमदारकीची माळ; पठारे यांच्यावर विकासाची जबाबदारी”

324_V_jpg-1280x720-4g.webp

पुणे – वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचा पराभव केला. गावकी-भावकीच्या राजकारणामुळे या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच झाली.

१० वर्षांनी पठारे यांना आमदारकीची माळ
सन २००९ नंतर तब्बल दहा वर्षांनी बापूसाहेब पठारे यांना पुन्हा आमदारकी मिळाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी, महायुतीतल्या अंतर्गत नाराजीचे चित्र सुरुवातीपासून स्पष्ट होते. कार्यकर्त्यांपासून ते माजी नगरसेवकांपर्यंत अनेकजण गोंधळलेल्या स्थितीत होते. भाजपनेही या मतदारसंघात दावा ठोकला होता, मात्र नंतर त्यांची तयारी क्षीण झाली.

मतदारसंघातील प्रश्न गंभीर
वडगावशेरी मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य यांसारख्या मूलभूत समस्या आजही कायम आहेत. वाढती लोकसंख्या आणि अनधिकृत बांधकामांमुळे पूरस्थिती निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याशिवाय ड्रेनेज व्यवस्था सुधारण्याची तातडीची गरज आहे.

स्थानिकांच्या अपेक्षा वाढल्या
पठारे यांना आता मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा लागणार आहे.

प्रमुख स्थानिक समस्या:
वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची दुरवस्था

पाणीपुरवठा व वीज समस्यांचे समाधान

पूरस्थिती रोखण्यासाठी पावसाळी वाहिन्यांचे जाळे उभारणे

अवैध धंदे व वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण

आरोग्य सुविधा आणि विकास प्रकल्पांना गती


राजकारण नव्हे, विकासाची गरज

विकासकामांना राजकारणाची अडथळा होऊ देता कामा नये, अशी भूमिका नागरिकांनी मांडली आहे. “पठारे यांनी विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत,” अशी जनतेची अपेक्षा आहे.

आता पठारे यांच्या नेतृत्त्वाखाली वडगावशेरीच्या समस्यांवर ठोस उपाय होतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Spread the love

You may have missed